*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Tuesday 2 January 2018

शेळीपालन

शेळी ही गरीबाची गाय मानली जाते. कारण तिला राहण्यासाठी कमी जागा लागते, तिचा खुराक कमी असतो. शेळीचे दुध आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरते. मत्स्य शेतीचा कृषि उद्योगांमध्ये महत्त्व फार असते. ओली मासळी आणि सुकी मासळी असे दोन प्रकार असतात. त्याचा हॉटेल उद्योगासाठी मोठी मागणी आहे. माशांचे अनेक प्रकार असून मत्स्यशेती ही कृत्रिमरित्यासुद्धा केली जाते. अशा प्रकारे शेती हा कृषि विषयक उद्योगांचा पाया आहे.भारतीय औद्योगिक विकासाला हातभार कृषि विषयक उद्योगातून मिळतो. 
भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी संकरित गायी पाळणे, कुक्कुटपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. शेळीपालन  हा त्यापैकी एक अत्यंत फायदेशीर पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.
शेळीपालनाची वैशिष्टये 
  • शेळी कुठल्याही हवामानात जगू शकते. विशेषतः उष्ण व कोरडया हवामानात शेळीची वाढचांगली होते. 
  • शेळीच्या आहारात मुख्यत्वेकरून झाडांचा पाला असतो. त्यात बाभूळ, चिंच, पिंपळ, शेवरी, बोर, अंजन यांचा समावेश होतो.
  • शेळीसाठी जागा कमी लागते. भांडवल कमी लागते. 
  • शेळीचा गर्भकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या गर्भकाळापेक्षा कमी म्हणजे १५० दिवस इतक्या कालावधीचा असतो व भाकडकाळ कमी असतो.
  • शेळीचे दुध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक उपयुक्त असते. 
  • शेळीच्या लेंडीखताला सेंद्रीय खत म्हणून फार किंमत आहे. टाक शेळी वर्षाला २०० किलो लेंडीखत देते. 
शेळ्यांचे व्यवस्थापन 
  • शेळ्यांना मोठया गोठयांची आवश्यकता नसते. उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होण्याइतपत चार फुट उंचीची भिंत व त्या ठिकाणी खाद्याची व्यवस्था इत्यादी सोयी असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम आहे. 
  • बंदिस्त जागा प्रत्येकी १२ चौ. फुट व मोकळी जागा प्रत्येकी २५ चौ. फुट असावी. 
  • खाद्याचे  प्रमाण साधारणतः प्रतिदिनी हिरवा चारा तीन – चार किलो, वाळलेला चारा राक किलो. टाक लीटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना १०० ते २०० ग्रामपर्यंत खुराक देणे आवश्यक आहे. 
  • शेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वड व पिंपळ झाडांचा पाला व फळे शेतीला आवडतात. 
  • प्रत्येक शेळीस दर दिवशी तीन ते चार लीटर पाणी प्यावयास लागते. 
करडांची जोपासना 
  • करडू जन्माला आल्यानंतर नाळ कापणे, नख्या कोरणे व सहा तासांच्या आत पहिले दुध पाजणे महत्वाचे आहे. 
  • करडू जन्माला आल्यानंतर पहिल्या २४ तासांत पिईल तेवढा चिक त्यास पिऊ देणे आवश्यक असते.
  • करडयाच्या वजनाच्या राक अष्टमांश इतका चीक प्रत्येक दिवशी त्यास पाजणे गरजेचे आहे.
म्हणून शेळीपालन कमी जोखमीचा आणि उत्तम आर्थिक लाभ मिळवून व्यवसाय देणारा आहे. 

शेळ्यांच्या जाती

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून  शेळ्यांच्या विविध जाती आढळतात. मांस व दूध देणाऱ्या जातींमध्ये महाराष्ट्रातील उस्मानाबादी, उत्तर-प्रदेशातील बारबेरी व जमनापारी, गुजरातमधील मलबारी, मेहसाना व झालावाडी, राजस्थानातील सिरोही, अजमेरी व कच्छी तर पंजाबातील बीटल सारख्या जातींचा समावेश होतो.
शेळी: जातीनिहाय वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील उस्मानाबादी शेळ्या त्यांच्या मांस व दुधासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहेत. या शेळ्या भराभर वाढतात व वर्षभरातच ४०-५० किलो वजनाच्या होतात. या शेळ्यांमध्ये जुळे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाळण्यासाठी सर्व अंगाने परवडतात. जातिवंत उस्मानाबादी शेळ्या या रंगाने काळ्या असतात, तसेच त्यांची शिंगे मागच्या बाजूने वळलेली असतात. या शेळ्यांचे कान लांब असून त्यांवर ठिपके असतात.कोकणातील शेळ्यांमध्ये स्थानिक सुधारणा करून कोकण कन्याळ ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. या जातीचा पूर्ण वाढीचा बोकड ५२ तर शेळी ३२ किलो वजनाची भरते. कोकण कन्याळ शेळी १७ व्या महिन्यात पिलाला जन्म देते.या शिवाय मांस उत्पादनासाठी आसाम डोंगरी, काळी व तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मिरी, गंजभ या जाती चांगल्या आहेत

Sunday 31 December 2017

शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग

शेळीपालन आणि भारत

  • जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे.
  • देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.
  • आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.

शेळयांच्या जाती

  • दूध उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी.
  • लोकरी उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी.
  • विदेषी जातीच्या शेळया उदा. सानेन ,टोने,बर्ग,अल्पाईन,एम्लोन्यूबियन,अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात.
  • अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते.
  • आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.

मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जाती

  • उस्मानाबादी- अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी]
  • संगमनेरी – अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी व दूधासाठी]
  • सिरोही – अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी व दूधासाठी]
  • बोएर – बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी]
  • सानेन- बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[दूधासाठी]
  • कोकण कन्याळ: अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी]

बंदीस्त शेळीपालन

शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे. जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता –
अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे चराऊ कुरणांचे उपलब्धतेनुसार शेळ्यांना पाच ते सात तास बाहेर चारून संध्याकाळी गोठ्यात आल्यावर थोडाफार चारा तसेच पूरक आहार देऊन शेळीपालन करणे. या पद्धतीमध्ये शेळ्यांचा आहारावरचा खर्च 60 ते 70 टक्के कमी होतो. बागायती भागात जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा आहे, तेथे हे शेळीपालन शक्‍य होते.

Tuesday 15 December 2015

हिरव्या चाऱ्यापासून तयार करा पोषक मुरघास

हिरव्या चाऱ्यापासून तयार करा पोषक मुरघास

सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात मुरघास बनवण्याचे नियोजन करावे. कारण या काळात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तयार झालेल्या मुरघासाची उपलब्धता फेब्रुवारी ते मे या काळादरम्यान होऊ शकते.
- मुरघास बनविण्यासाठी एकदल (तृणधान्य) पिके जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके तसेच द्विदल (डाळवर्गीय) पिके जसे की लुसर्ण, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर करावा.
- एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कार्बोदकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे.
- द्विदल पिकांच्या चाऱ्यांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण जास्त असते.
- या व्यतिरिक्त हिरव्या चाऱ्याच्या बरोबरीने कृषी उद्योगातील टाकाऊ पदार्थ, फळे व भाजीपाल्यातील टाकाऊ पदार्थांचा वापरून चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करता येतो. अशा प्रकारच्या मुरघासामध्ये कमीत कमी 40 ते 50 टक्के चारा पिके असावीत.

मुरघास बनवण्याच्या पद्धती - अ) पारंपरिक पद्धती -
- जमिनीत मुरघास तयार करण्यासाठी योग्य आकाराचे खड्डे करावेत.
- सायलोपीट - जमिनीखालील सिमेंट कॉंक्रीटसहित व विरहित खड्डे.
- बंकर सायलो - जमिनीखालील किंवा जमिनीवरील सिमेंट कॉंक्रीटसहित व विरहित खड्डे.
- टॉवर सायलो - जमिनीवरील टॉवरवरील पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करता येतो.

ब) आधुनिक पद्धती -
1) प्लॅस्टिक बॅग सायलेज -
विविध क्षमतेच्या व गुणवत्तेच्या प्लॅस्टिक बॅग वापरून उच्च प्रतीचा मुरघास तयार करता येतो. अशा प्रकारच्या प्लॅस्टिक बॅगा 5 किलो, 10 किलो, 50 किलो, 100 किलो, 500 किलो, 1000 किलो अशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या बॅगचा आकार हा आयातकार, चौरस, गोलाकार असतो. अशा प्रकारच्या बॅगा वारंवार वापरात येऊ शकतात. हाताळायलाही सोप्या असतात.

2) ड्रम सायलेज -
काही ठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेचे प्लॅस्टिक ड्रम वापरून मुरघास बनवता येतो. प्लॅस्टिक ड्रमची क्षमता 100 ते 300 लिटरपर्यंत असते. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मुरघास तयार करावयाचा आहे आणि साखळी पद्धतीने वापर करावयाचा आहे, त्या ठिकाणी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे.

3) बांबू सायलो -
ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध असतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे बांबू सायलो बनवले जातात. सर्वसाधारणपणे 5 मीटर x 5 मीटर x 5 मीटर आकाराची बांबूची चौकट तयार करावी. या चौकटीच्या आतून 150 ते 200 मायक्रॉन जाडीचा प्लॅस्टिकचा कागद अंथरावा. त्यामध्ये साधारणतः 1000 ते 1500 किलोपर्यंत मुरघास तयार होतो.

मुरघास तयार करण्याची प्रक्रिया -- चारापिकाचे साधारणपणे 1 ते 2 इंच लांबीचे कुट्टी यंत्राच्या साह्याने तुकडे करून घ्यावेत.
- मुरघासासाठी तयार केलेल्या खड्ड्यामध्ये प्रथमतः प्लॅस्टिकचा कागद सर्व बाजूंनी अंथरावा. त्यावर चारा पिकाच्या कुट्टीचा थर पसरवावा.
- इतर पद्धतीमध्ये चारापिकाची कुट्टी बॅगेत किंवा ड्रममध्ये किंवा बांबूच्या चौकटीत व्यवस्थित भरायला सुरवात करावी.
- मुरघास बनत असताना आंबवण प्रक्रियेला मदत करण्यासाठी आम्ल तयार होत असते. त्यासाठी काही उपायकारक जिवाणूंची गरज असते म्हणून अशा प्रकारचे जिवाणू जर कुट्टीबरोबर मिसळले तर मुरघास लवकर व उत्तम दर्जाचा तयार होतो. त्यासाठी अशा प्रकारचे जैविक संवर्धक आजकाल बाजारात उपलब्ध असतात. त्यांचा योग्य वापर चांगल्या दर्जाचा मुरघास होण्यासाठी आपण करू शकतो.
- मुरघास तयार करण्यासाठी कुट्टीवर युरिया, मीठ, उसाची मळी किंवा गूळ आणि खनिज मिश्रण हे पदार्थ वापरून योग्य प्रक्रिया केल्यामुळे मुरघासाची प्रत वाढवण्यास मदत होते.
प्रतिटन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पदार्थ ः
- युरिया - 1 किलो
- मीठ - 1 किलो
- उसाची मळी किंवा गूळ - 2 किलो
- खनिज मिश्रण - 1 किलो
वरील घटक वेगवेगळे मोजून घेऊन 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याचे मिश्रण करावे. तयार झालेले मिश्रण कुट्टीवर शिंपडावे. चाऱ्याचा थर चांगला दाबून घ्यावा.
- कुट्टी व वरील मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरवून कुट्टी व्यवस्थित दाबून घ्यावी. जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. थर भरताना पायाने किंवा घूमस वापरून त्यातील हवा बाहेर काढावी. जर हवा आत दबून राहिली तर त्यामध्ये बुरशी होऊन मुरघासाची प्रत कमी दर्जाची होऊ शकते.
- खड्डा / ड्रम / बॅग / बांबू सायलो इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून उपलब्ध असणारा पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा वाळलेले गवत इत्यादी थर पसरून आच्छादन करावे.
- अशा प्रकारे तयार केलेल्या आच्छादनावर 4 ते 5 इंचांच्या मातीचा थर द्यावा. जेणेकरून हवाबंद स्थिती व्यवस्थित होईल. गरज भासल्यास वरून परत एकदा प्लॅस्टिक कापड झाकावे, त्यामुळे पावसाचे पाणी मुरघासामध्ये जाणार नाही.
- हवाबंद केलेला मूरघास हा 40 ते 50 दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.

अशी होते मुरघासाची प्रक्रिया - - मुरघास तयार होताना वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन चारा आंबवला जातो. हिरव्या चाऱ्याच्या पेशींमध्ये मुरघास तयार होताना श्‍वसन प्रक्रियेचा वेग जास्त असतो. या श्‍वसन प्रक्रियेत प्राणवायूचा उपयोग केला जातो. हवाबंद स्थितीत प्राणवायू संपुष्टात आल्यानंतर बुरशीची वाढ होऊ शकत नाही. काही प्रकारचे जीवाणू चाऱ्यातील शर्करा व कार्बोदके यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आम्ल तयार करतात.
- लॅक्‍टिक ऍसिड आम्ल प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होते, तसेच ब्युटिरिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड ही अल्पशा प्रमाणात तयार होतात. या आम्लांच्या सान्निध्यात असलेल्या जिवाणूंची वाढ होत नसल्यामुळे चारा कुजत नाही. आम्लांचे प्रमाण वाढल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया थांबते. आंबवण्याची प्रक्रिया वाढते.

मुरघासाची प्रत - - मुरघास बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या आम्ल व अल्कोहोलमुळे मुरघासाला गोड-आंबट असा सुगंध व चव येते, त्यामुळे जनावरे अशा प्रकारे तयार झालेला मुरघास चवीने व आवडीने खातात.
- उत्तम प्रतीचा मुरघास सोनेरी पिवळसर रंगाचा असतो.

मुरघासाचे फायदे - - पावसाळ्यामध्ये आवश्‍यकतेपेक्षा अधिक उत्पादित झालेला हिरवा चारा मुरघासाच्या माध्यमातून टिकवून ठेवून उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढता येते.
- हिरवा चारा कापून जनावरांना खाऊ घालताना त्यातील काही अन्नघटकांचे होणारे नुकसान मुरघासाच्या माध्यमातून टाळता येऊ शकते.
- महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन दूध वाढण्यास व दुधामध्ये सातत्य टिकून राहण्यास मदत होते. जनावरांची भूक वाढते.
- जनावरांना लागणाऱ्या खुराकाची बचत होऊन खाद्यावर होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते.
- यातील तयार होणाऱ्या विविध आम्लांचा उपयोग शरीर पोषणासाठी होतो. वाळलेल्या चाऱ्यातील असणाऱ्या अन्नघटकांची कमतरता भरून निघते.
- मुरघास बनविण्याच्या पद्धतीमुळे पिकाखालील क्षेत्र मशागतीसाठी लवकर उपलब्ध होते. दुबार पीक घेणे शक्‍य होते.

मुरघासासाठी चारा पिकांची निवड - - मुरघासासाठी चारा पिकांची निवड करताना ते पीक लवकर फुलोऱ्यात येणारे व लवकर तयार होणारे असावे.
- पीक हिरवे आणि लुसलुशीत असावे. पिकाची फुलोरा येण्याआधीची अवस्था पीक कापणीसाठी योग्य असते.
- मुरघासासाठी निवडलेल्या पिकाचे खोड भरीव असावे. भरीव खोडाचे तुकडे व्यवस्थित होतात. अशा प्रकारच्या पिकांच्या खोडात भरपूर शर्करा व कार्बोदके असतात.
- मुरघासासाठी वापरण्यात येणाऱ्या चारा पिकामध्ये कापणीच्या वेळी पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावे. जर पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल तर 4 ते 5 तास पीक उन्हात वाळू द्यावे जेणेकरून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.

मुरघास द्यावयाची पद्धत - - 50 ते 60 दिवसांनी तयार झालेला मुरघास उघडल्यानंतर काही वेळ तसाच उघडा ठेवावा. आवश्‍यकतेनुसार हवा तेवढाच मुरघास काढून घ्यावा. मुरघास काढून घेतल्यानंतर उरलेला मुरघास प्लॅस्टिकच्या कागदाने परत तसाच झाकून ठेवावा.
- सर्वसाधारणपणे दिवसाला प्रत्येक गाईस 20 ते 25 किलो मुरघास द्यावा. मुरघासाचे प्रमाण दूध देण्याच्या क्षमतेवर व हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
- आपल्या आवश्‍यकतेनुसार खड्डा करावा. साधारणपणे 1 फूट x 1 फूट x 1 फूट आकाराच्या खड्ड्यात 15 ते 16 किलो मुरघास मावतो.

संपर्क - (020) 26926248/26926265
(लेखक बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे येथे कार्यरत आहेत.)

भूईमूग शेंगा तोडणी यंत्र

भूईमूग शेंगा तोडणी यंत्र 



उन्हाळी हंगामात भुईमूग आणि सूर्यफुलासारखी पीके काढणीसाठी एकाच वेळी येतात. ही पीके काढल्यानंतर त्याच्या शेंगा वेगळ्या करताना मजुरांची मोठी टंचाई भासते. यावर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णा चरापले यांनी भुईमूगाच्या शेंगा तोडणारे आणि सुर्यफुलाची मळणी करणारे यंत्र बनवले आहे. या यंत्रामुळे त्यांचे भुईमूग आणि सूर्यफुलाच्या काढणीचे काम सोपे झाले आहे. 

रसायनशास्त्राचे पदवीधर असलेले कृष्णाभाऊ चरापले हे भोगावती हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. पंचक्रोशीत ते के बी या नावाने प्रसिद्ध आहेत. विज्ञान शिक्षकाचा पिंड आणि हाडाचा शेतकरी यामुळे शेतात काम करताना येणाऱ्या अडचणींकडे बघण्याची वेगळी दृष्टी त्यांना लाभली होती. त्यांच्या भागात उन्हाळी भुईमूग आणि सूर्यफुलाची शेती केली जाते. काढणीला मजुर न मिळणे हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले. के.बी यांनी यावर उपाय शोधायचे ठरवले. त्यांनी २००५मध्ये सायकलचे भाग वापरून शेंगा तोडणारे यंत्र बनवले. यामधील अडचणींची सुधारणा करत २००८ मध्ये पॅडलवर चालणारे शेंगा फोडणी यंत्र तयार झाले.

या यंत्राला जाळीचा अडीच फूट लांब आणि एक फूट व्यास असणारा ड्रम बसवला आहे. या ड्रमवर एक बाय एक इंचाची जाळी बसवण्यात आली आहे. या जाळीवर आडव्या पट्ट्या बसवण्यात आल्या आहेत. यावरच भूईमूगाच्या शेंगा किंवा सोयाबीनची मळणी केली जाते. हा ड्रम एका स्टँन्डवर फिट करण्यात आला आहे. याला नऊ आणि दिड इंची गिअर बसवण्यात आलेत. पायडल दाबून शाप्टद्वारे गिअरला गती मिळते आणि ड्रम वेगाने फिरतो. या फिरणाऱ्या ड्रमवरच्या जाळीत अडकून शेंगा वेगळ्या होतात. एका एकरातील शेंगा तोडायचे काम तीन मजूर चार दिवसांत पूर्ण करू शकतात. 

तीन मजूर एका दिवसात या यंत्राच्या सहाय्याने २५० ते ३०० किलो शेंगा तोडण्याचे काम सहज करतात. हेच काम हाताने करायचे झाल्यास एक मजुर दिवसात ३० ते ५० किलो शेंगा तोडू शकतो. या यंत्राच्या सहाय्याने सूर्यफुलाची मळणी करायची असल्यास ३ मजूर ४ दिवसांत एक एकरातल्या सुर्यफूलाची मळणी करु शकतात. याउलट मजुरांनी या यंत्राशिवाय हाताने एक एकरातल्या सुर्यफूलाची मळणी करायचे झाल्यास ३ मजुरांना १० दिवसांचा कालावधी लागतो. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे एकरी १.५ ते २ हजार रुपयांची बचत होते. शिवाय वेळ आणि कष्टांची सगळ्यात जास्त बचत होते. 

या भूईमूग तोडणी यंत्रामुळे कृष्णा चरापले यांना गेल्यावर्षी नॅशनल इनोव्हेशन फौंडेशन संस्थेने नवसंशोधनाचे प्रमाणपत्र दिले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही एका प्रदर्शनात त्यांचे कौतुक केले. चपराले यांनी परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी या मशिनची निर्मिती केली. त्याची विक्री ते अवघ्या पाच हजार रूपयांत करतात. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ आणि पैसै वाचण्यात मदत झाली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळायला हवे. यामुळे के. बी. यांच्यासारखे असंख्य संशोधक देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांचे श्रम कमी करतील हे नक्की...

Thursday 16 October 2014

गाई-म्हशींचा स्तनदाह

गाई-म्हशींचा स्तनदाह :

गाई-म्हशींचा स्तनदाह हा एक असा रोग आहे जो कि प्रायः अधिक दुध देणा-या जनावरांना भेडसावतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचा ओवा / सड सुजतात आणि दुधात  खराबी येते. कधी-कधी ओवा दुःखदायक होतो तसा तो गरम देखील जानवतो. स्तनदाह रोगास ग्रामिन भगात थन रोग किंवा दुधात खराबी येणे असे म्हणतात. अधिकतर हा रोग विभिन्न प्रकारच्या जीवाणुंद्वारा उद् भवतो जे कि जनावरांच्या सडांवर जमा होतात आणि ओव्यास झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडांच्या छीद्रात पोहचतात व कासेमध्ये प्रवेश करतात यासाठी खाली दिलेल्या आकृतीचा अभ्यास करा.

या रोगाचे तीन प्रकार आढळतात :
१) लक्षण रहीत रोग- या रोगाचे निधान दूधाचे परिक्षण केल्यावरच होते कारण या प्रकारच्या बाधेत स्तन सुजत नाहित किंवा दुधात कोणतीही खराबी दीसत नाही. हा रोग जास्त 
     नुकसानदायक असतो.
२) लक्षण सहीत रोग- या रोगबाधेत ओव्याची सुज, दूध नासणे (फाटणे) व पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादि लक्षणे आढळतात.
३) जुनाट रोग- या रोगात जनावरांच्या ओव्यात रोगकारक जंतु दिर्घ काळ पर्यंत वास्तव्य करुन आपली संख्यात्मक वाढ करित असतात तथा दुध तयार करणा-या ग्रंथींचा नाश करतात. ओवा आकाराने लहान व कडक होतो.

औषधोपचार :
हा रोग समजल्या बरोवर पशु चिकित्सकाशी तात्काळ संपर्क करुन आजारी जनावरांचा लवकर उपचार करायला हवा अन्यथा या बाधेत दुध तयार करणा-या पेशींमधे खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते.

रोगनियंत्रण :
१)       जनावरे आणि गोठे स्वच्छ ठेवा.
२)      जनावरांच्या सडाला इजा होवू दऊ नका.
३)      दूध काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढा.
४)      दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुऊन घ्या.
५)     ज्या सडात खराबी आहेत त्या सडाचे दुध शेवटी काढा व ते उपयोगात आणु नका.
६)      दूध काढल्यानंतर सड जिवाणु रोधक (अँन्टीसैपटीक) द्रावण (पोलीसान- डी , सोडीयम हाइपोक्लोराइड, अथवा क्लोरहैक्सीडीनच्या (सॅव्हलॉन) ०.५% द्रवणाने दररोज दूध दोहल्यानंतर 
      टीट- डीप करायला हवे.
७)     दूध दोहन पश्चात जनावर किमान अर्धा तास उभे राहिल याची दक्षता घ्या.
     स्तनदाह या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषधोपचाराचा खर्च आणि पर्यायाने आर्थिक नुकसान वाचविता येईल.









आधार : (घडीपत्रिका क्रमांक १९/२००४), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.

गहू :

गहू :

गहू (ट्रीटीकम एसपी) एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या 
जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. यद्यपि येथे अनेक जाति आहेत. वर्ष 1965 मध्ये उच्च 
उत्पन्न प्राप्त करणा-या वनस्पतिंच्या प्रकारांची ओळख झाल्यापासून, येथे प्रत्येक हेक्टर उत्पन्नामध्ये 
नियमित वृद्धी झाली आहे. ह्यावेळी राष्ट्रीय सरासरी जवळपास 2500 किग्रा./हेक्टर आहे. गव्हाला 
पिकण्या करिता कोरडा, उष्ण हंगामानंतर येणारा सापेक्षतेने थंड, ओलसरपणा वाढविणारा हंगाम आवश्यक
 आहे. अनुकूलतम वाढ स्थिति 12 सेल्सीयस व 230सेल्सीयस दरम्याने तापमानावर प्राप्त होणार आहे.
 350 मिमी. किंवा अधिक ते 1250 मिमी. पर्यंतचा पाऊस पिकविण्याच्या चक्रामध्ये अनुकूलतम मानण्यात
 येतो. गहू रेताड चिकणमाती ते चिकणमाती घडणीची खोल माती वर चांगला पिकेल. 6.0 ते 8.2 ची 
एक पीएच श्रेणी अनुकूलतम मानण्यात येते.

वर्धा जिल्ह्याची माती, जंगलाची नापीक माती वगळून, गहू पिकविण्याकरिता मूल्यमापित करण्यात आली 
आहे. उच्च व निम्न जलोढ माळांची दोन प्रकारची माती, त्यांच्यामध्ये गहू पिकविण्याकरिता
 अनुकूलतम स्थिति असल्यामुळे, योग्य मानण्यात आली आहे. इतर बहुतेक सर्व माती माफक प्रमाणात 
योग्य व मामुली योग्य मानण्यात आली आहे, उलटपक्षी निम्न त्रिकोणी भाग व माळाची माती ह्यावेळी 
योग्य नाही आहे रुपात मानण्यात आली आहे व उच्च त्रिकोणी भागाची माती स्थायी रुपात योग्य नाही आहे,
असे मानण्यात आली आहे.

आधार(मार्च-२००५) नँशनल ब्युरो आँफ साँईल सर्व्हे अँन्ड लँन्ड युज प्लानिंग, नागपुर

कोरडवाहू व बागायती गव्हाचे शिफारसीत वाण

कोरडवाहू व बागायती गव्हाचे शिफारसीत वाण

अ.क्र.
जात
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)
दाण्याचा रंग
प्रती हेक्टरी उत्पादन
अ) कोरडवाहू
१.
एन ५९
५५-६०
११५-१२०
४०-५४
पिवळसर
८-१०
२.
एमएसीएस १९६७
५५-६०
१०५-११०
४२-४५
पिवळसर
८-१०
३.
एन आय ४५३९
५५-६०
१०५-११०
३५-३८
पिवळसर
१०-१२
४.
एकेडीडब्लू २९९७-१६(शरद)
५०-६०
११०-११५
४५-५५
पिवळसर
१२-१४
ब) बागायती वेळेवर पेरणी
१.
एचडी २३८०
५५-६०
१०५-११०
३८-४०
पिवळसर
३०-३५
२.
एमएसीएस २४९६
६०-६५
११०-११५
३८-४०
पिवळसर
३०-३५
३.
एचडी २१८९
६०-६५
११०-११५
४०-४२
पिवळसर
३०-३५
४.
पूर्णा (एकेडब्लू १०७९)
६५-७०
११०-११५
४०-४२
पिवळसर
३०-३५
५.
एमएसीएस२८४६
६५-७०
११०-११५
४५-५०
पिवळसर
३०-३५
६..
एकेएडब्ल्यू ३७२२ (विमल)
५०-६०
१०५-११५
४०-४२
पिवळसर
३०-३५
क) बागायती उशिरा पेरणी
१.
एकेडब्ल्यू ३८१
५५-६०
९०-९५
४४-४६

२५-३०
२.
एच आय ९९९
५५-६०
१००-१०५
४०-४२

२५-३०
३.
एचडी २५०१
५५-६०
१०५-११०
४०-४२

२५-३०
४.
पूर्णा (एकेडब्ल्यू १०७१)
५५-६०
१००-१०५
४०-४२

२५-३०
५.
एनआयएडब्ल्यू ३४
५५-६०
१००-१०५
४०-४२

२५-३०
टिप: गव्हाच्या कल्याण सोना, सोनालीका आणि लोक वन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करु नये.

आधारकृषीसंवादिनी-(डिसेंबर २००७), डाँ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअकोला.